Bagalkot

बागलकोट : अपुऱ्या बससेवेमुळे ग्रामस्थ आक्रमक; रास्ता रोको करत केला निषेध

Share

बागलकोट जिल्ह्यातील शिरूर गावात दररोज शाळा-महाविद्यालयांच्या वेळी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. आपल्या मुलांचा रोजचा संघर्ष पाहून ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि त्यांनी परिवहन मंडळाच्या बस अडवून जोरदार निदर्शने केली.

रायचूर-बेळगाव राज्य महामार्गावर शिरूर गावातील ग्रामस्थांनी बस थांबवून परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांवर आपला संताप व्यक्त केला. पोलिसांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र जोपर्यंत परिवहन मंडळाचे अधिकारी स्वतः गावात येऊन ही समस्या सोडवत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

Tags: