उत्तर कर्नाटकच्या विकासावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून चर्चा व्हावी, अशी मागणी विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी विधानसभाध्यक्ष यू.टी. खादर यांना पत्राद्वारे केली आहे.
विजयपूर शहराचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी आपल्या पत्रात उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक भागांमधील प्रादेशिक असमानता मिटवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. दरवेळी उत्तर कर्नाटकच्या विकासावर चर्चा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसांवर ढकलली जाते. यामुळे त्या दिवशी उपस्थिती कमी राहते आणि चर्चाही अपूर्ण राहते.
उत्तर कर्नाटकातील पाणी पुरवठा योजना, शेतकऱ्यांचे प्रश्न, औद्योगिक आणि शैक्षणिक प्रगती या मुद्द्यांवर चर्चा अधिवेशनाच्या प्रारंभिक टप्प्यात होणे आवश्यक आहे. यासाठी सुरुवातीपासूनच प्राधान्य दिले जावे, अशी मागणी पत्राच्या माध्यमातून त्यांनी केली आहे.


Recent Comments