Banglore

मुख्यमंत्र्यांविरोधात एफआयआर: अधिक चर्चा योग्य नाही : उपमुख्यमंत्री

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात दाखल झालेल्या एफआयआरच्या मुद्द्यावर आम्ही खूप बोललो आहोत, परंतु आम्हाला त्यावर अधिक चर्चा करायची नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दिली.

आज बंगळुरूमध्ये बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात नोंदवलेल्या एफआयआरवर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, एआयसीसी अध्यक्षांनी या मुद्द्यावर आधीच भाष्य केले आहे. “आम्ही या विषयावर अधिक चर्चा करू इच्छित नाही,”

यंदा महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यलढ्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आम्ही यावेळी गांधी जयंती खास पद्धतीने साजरी करण्याचा विचार केला. याचाच पहिला टप्पा म्हणून आम्ही स्वच्छता अभियान राबवणार आहोत. जिल्हा, तालुका आणि महामंडळ स्तरावर गांधी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून याच अनुषंगाने बेंगळुरू येथे एक किलोमीटर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता अभियानासंदर्भात ॲप विकसित करण्यात येत असून वर्षातून एकदा हा कार्यक्रम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: