राज्य सरकारने मंदिरांना अनुदान देण्यास रोखले असून, माजी मंत्री शशिकला जोल्ले यांनी या मुद्द्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
भारतीय संस्कृतीत मंदिरांना खूप महत्त्व आहे. आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही मंदिरे आणि देवस्थानांच्या जीर्णोद्धारासाठी अनुदान दिले. निवडणूक आचारसंहितेमुळे दुसरा हप्ता जाहीर झाला नाही. आता काँग्रेस सरकारने हे अनुदान रोखल्याचा मी निषेध करते. यामुळे सरकारचा गौरव होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
मंदिरांबाबत सरकारकडून पक्षपात होता कामा नये. आम्ही जे मंजूर केले आहे ते जाहीर करणे ही सरकार आणि संबंधित मंत्र्यांची जबाबदारी आहे. सरकारने हा आदेश मागे घ्यावा. राज्यातील मंदिरांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. अन्यथा सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments