Belagavi

टाकाऊ वस्तूंच्या पुनर्वापराने प्रदूषण रोखणे शक्य : अपर्णा पुजारी

Share

टाकाऊ पदार्थांमुळे धरणीमाता प्रदूषित होत आहे. त्यामुळे लोकांनी वापरलेल्या वस्तूंचा पुनर्वापर केल्यास ते स्वयंरोजगारासह आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील आणि प्रदूषण रोखू शकतील, असे धारवाडमधील पर्यावरण-उद्योजक अपर्णा पुजारी यांनी सांगितले.

शिवबसव नगर येथील लिंगायत भवन येथे जागतिक महिला दिनानिमित्त लिंगायत महिला समाजातर्फे आयोजित पेपर कला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना अपर्णा पुजारी म्हणाल्या की, टाकाऊ कागदापासून विविध वस्तू बनवता येतात. निकामी कागदापासून पेन्सिल बनवता येते आणि अनेक झाडे जपली जाऊ शकतात.

कार्यक्रमात धारवाडच्या विजया नुली यांनी पेपर आर्टचे प्रात्यक्षिक दिले. सुजाता वस्त्रद यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. लिंगायत महिला समाजाच्या माध्यमातून पुष्पांजली बिक्कन्नवर यांच्या वतीने कर्णबधिर मुलांच्या शाळेच्या वाचनालयाला कन्नड कथांची पुस्तके भेट देण्यात आली. लिंगायत महिला समाजाच्या संस्थापक शैलजा बिंगे, भारती संकन्नावर उपस्थित होत्या. यावेळी पेपर आर्ट स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
अध्यक्षा वीणा चिन्नन्नावर यांनी स्वागत केले. सचिव गीता गुंडकल्ली यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Tags: