Vijayapura

बबलादी सदाशिव जत्रेत देवाला करतात फक्त दारू अर्पण

Share

सर्वांनी देवाला फुले, फळे, अन्नपदार्थ अर्पण करताना पाहिले आहे. मात्र विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील बबलादी सदाशिव जत्रेत देवाला फक्त दारूच अर्पण केली जाते. याशिवाय भाविक प्रसाद म्हणून दारूचे सेवन करतात. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या बबलादी सदाशिव जत्रेत दारू दिली जाते.

शिवरात्रीनंतर भरणाऱ्या बबलादी सदाशिव जत्रेत देवाला फुले व फळांऐवजी मद्याचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणून या सदाशिव जत्रेला दारूची जत्रा असे म्हणतात. या वार्षिक जत्रेत सांगितले जाणारे भविष्य कधीच खोटे ठरत नाही . या जत्रेला कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील विविध भागातून लाखो भाविक येतात. स्त्रियाही हे मद्य प्रसाद म्हणून स्वीकारतात.

शेकडो वर्षांपासून येथे केलेली भविष्यवाणी खरी ठरत आहेत. वर्षभराचा पाऊस आणि पिकांबाबतच्या अचूक विधानांमुळे, शेतकरी या विधानाच्या आधारे पिके घेत आहेत. . सदाशिव जत्रेत प्रत्येक शेतकऱ्याला मंदिराच्या आवारात धान्य दिले जाते. शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्यासोबत हे धान्य पेरले तर त्या वर्षीचे पीक भरपूर येते अशी धारणा आहे . त्यामुळे भाविकही मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे येत आहेत.

सदाशिव जत्रेत कर्नाटक-महाराष्ट्रासह अनेक ठिकाणाहून हजारो भाविक येत असतात, पाच दिवस चालणारी ही जत्रा अनोखी आणि वेगळी असते.

Tags: