रमेश जारकीहोळी यांचा ग्रामीण क्षेत्राशी काय संबंध , त्यांचे येथे काय काम आहे, असे म्हणत चन्नराज हट्टीहोळी यांनी माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर ताशेरे ओढले.
शनिवारी दुपारी ग्रामीण भागातील राजहंस गडावर दोन्ही नेत्यांच्या गाड्या समोरासमोर आल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, रमेश जारकीहोळी हे ग्रामीण भागात विनाकारण फिरत आहेत. त्यांनी विचारले इथे काय चालले आहे.
तसेच, राजहंसगड किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचे निमंत्रण पत्रही अंतिम झालेले नाही. इथे शिष्टाचाराचा भंग होण्याचा प्रश्नच येत नाही. पण ते काय वेगळेच म्हणत आहेत . रमेश जारकीहोळी आगीशी खेळत आहेत, हे विसरू नका, असा टोला चन्नराज यांनी लगावला.


Recent Comments