विरोधी पक्षांच्या काळात त्यांनी किती वेळा शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले याचा आधी हिशोब द्यावा, अशी टीका करत सहकार मंत्री लक्ष्मण सवदी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पावसाअभावी निर्माण झालेली पाण्याची टंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. कृष्णा नदीचा प्रवाह ओसरल्यानंतर उपसा सिंचन योजनांवर मर्यादा येण्याची शक्यता असून, नोव्हेंबरनंतर आठवड्यातून एक दिवस पंपसेट बंद ठेवावे लागतील.

उसासह सर्व पिकांना योग्य भाव मिळण्यासाठी केंद्र सरकारने हमीभाव (MSP) वाढवणे गरजेचे आहे. गेल्या दहा वर्षांत यात अपेक्षित सुधारणा झालेली नाही. साखर आणि उस उत्पादनाचा ताळमेळ घालून दर निश्चित केले पाहिजेत.
विरोधकांच्या पदयात्रेमुळेच तीन दिवसांचे अधिवेशन बोलावल्याच्या आरोपाचा समाचार घेताना सवदी म्हणाले की, ‘मी आरवलो म्हणूनच सूर्य उगवला’ असा गैरसमज विरोधकांनी बाळगू नये. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल तयार करून केंद्र सरकारकडे पाठवला जाईल.


Recent Comments