राज्य सरकारने चालू वर्षाचा अर्थसंकल्प बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमध्ये सादर करून नवा इतिहास घडवावा, अशी मागणी सर्वधर्म श्री सिद्धरामय्या जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष पंचाक्षय्या गणाचारी यांनी केली आहे.

मंगळवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महात्मा गांधीजींनी भूषवलेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाचे शताब्दी वर्ष राज्य सरकारने मोठ्या उत्साहात साजरे केले आहे. तसेच, सरकारच्या गॅरंटी योजनांनी संपूर्ण जगात एक आदर्श निर्माण केला आहे. आता बेळगावचे नाव जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे कोरण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन येथेच घेणे आवश्यक असल्याचे पंचाक्षय्या गणाचारी यांनी सांगितले.
बेळगाव शहर कर्नाटकची दुसरी राजधानी म्हणून विकसित होत असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी येथे अर्थसंकल्प सादर केल्यास हा जागतिक स्तरावर एक ऐतिहासिक निर्णय ठरेल. कर्नाटकच्या गॅरंटी योजनांचे अनुकरण आता इतर राष्ट्रेही करत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी बेळगावला प्राधान्य देऊन जनतेचा विश्वास संपादन करावा, अशी प्रतिक्रिया पंचाक्षय्या गणाचारी यांनी व्यक्त केली.


Recent Comments