धारवाड जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात युरिया खत उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी धारवाडमध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले.

अखिल भारतीय किसान कामगार संघटना तसेच इतर शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वर्षाला किती प्रमाणात युरिया खताची गरज असते, याचे सामान्य ज्ञानसुद्धा केंद्र आणि राज्य सरकारांना नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. काही ठिकाणी जास्त दराने युरिया विकला जात आहे, पण हे रोखण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. “शेतकऱ्यांना केवळ दोन युरियाच्या गोण्या देऊन चालणार नाही, तर त्यांना अधिक प्रमाणात खत उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


Recent Comments