आरसीबी संघाच्या सन्मान समारंभादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत झालेल्या मृत्यूंना आम्ही इतरांना जबाबदार धरत नाही. ही एक अनपेक्षित घटना होती. भाजपच्या टीका-टिप्पण्यांना उत्तर देण्याची ही वेळ नाही, असे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी सांगितले.

आज बेंगळूरूमध्ये माध्यमांशी बोलताना ते भावूक झाले होते. ते म्हणाले की, पोलीस आयुक्तांनी तात्काळ कार्यक्रम थांबवण्यास सांगितल्यानंतर लगेचच सर्व थांबवण्यात आले. लाखो लोक उपस्थित असल्याने नेटवर्कही जाम झाले होते. कुठे काय चालले आहे, हे समजणे कठीण झाले होते. आम्हाला माध्यमांकडूनच माहिती मिळाली. आता भाजपच्या राजकीय टीका-टिप्पण्यांना उत्तर देण्याची वेळ नाही.
या सर्वांना मी दुसऱ्या वेळी उत्तर देईन. त्यांच्या काळातही अनेक घटना घडल्या आहेत. मी डर्टी पॉलिटिक्स बोलू इच्छित नाही, असे त्यांनी नमूद केले. मी या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरत नाही. अनेक लोकांनी आपले आयुष्य गमावले आहे, याबद्दल आपल्याला दुःख आहे अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
Recent Comments