खासगी शालेय बसच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात १५ मेंढ्या आणि एका म्हशीच्या वासराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील तडवलगा गावाजवळ घडली.

शालेय बस चालकाच्या अतिवेगामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. वेगात असलेल्या या शालेय बसने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिली, यात १५ मेंढ्या आणि एका म्हशीचे वासरू जागीच ठार झाले. सत्यप्पा टेंगाळे यांच्या ३२ मेंढ्यांपैकी १५ मेंढ्यांचा मृत्यू झाला असून, उर्वरित मेंढ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना होर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
Recent Comments