बेळगावच्या राघवेंद्र कॉलनीतील श्री साई मंदिरात आंब्याच्या फळांनी आकर्षक सजावट करून विशेष पूजा करण्यात आली. राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारी भक्तिभावाने पूजन पार पडले. यावेळी दहावी व पीयूसी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला.

राघवेंद्र कॉलनीतील साईबाबा मंदिर हे नव्याने बांधण्यात आलेले असून अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या दिवशी या मंदिराच्या भूमिपूजनाचा मान मिळाला होता. या आठवणीला जपणाऱ्या मंदिर समितीने यंदा गुरुवारी आंब्याच्या फळांनी साईबाबांची भव्य आरास केली. कपिलेश्वर मंदिरातील आरास परंपरेप्रमाणेच साईबाबांच्या मंदिरातही हाच पवित्र भाव जपला गेला.

या पूजेसाठी सकाळी ७, दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता विशेष पूजा करण्यात आली. संध्याकाळी या आंब्यांचे फळ भक्तांना प्रसादरूपाने वाटण्यात आले. मंदिर समितीचे अध्यक्ष महेश वेर्णेकर म्हणाले, राघवेंद्र कॉलनीतील हे साई मंदिर हे भक्तांच्या श्रध्देने उभारले गेले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळीच याच्या भूमिपूजनाचा संकल्प करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही आंब्यांनी साईबाबांना अलंकार करण्याचा निर्णय घेतला.
अक्षय तृतीयेनिमित्त विशेष पूजनासोबतच राघवेंद्र कॉलनीतील दहावी आणि पीयूसी परीक्षांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. या वेळी मंदिराचे पूजारी म्हणाले की, साई मंदिर समाजाभिमुख उपक्रमांचे सातत्याने आयोजन करत असून, भाविकांच्या सहकार्याने प्रत्येक उपक्रम उत्साहात पार पडतो.

यावेळी मयूर वेर्णेकर, विजय नैनार, श्रीधर तिगडी, विनायक रायकर, श्रीशैल मड्डी, नीलकंठ सुतकट्टी, कृष्णाराजेंद्र ताळूकर, सतीश भजंत्री, प्रवीण पोतदार, महेश वडगावी यांच्यासह मंदिर समितीचे सदस्य, परिसरातील नागरिक, भाविक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments