कोणताही पक्ष निवडणूक जिंकून सरकार स्थापन करेल, भाजप ‘ऑपरेशन कमळ’च्या माध्यमातून सरकार पाडेल. पण आता ‘एक देश, एक निवडणूक’च्या नावाखाली अनेक राज्य सरकारे पाडली जाणार आहेत, अशी गंभीर टीका उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केली आहे.

बेंगळुरू येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, जर निवडणूक कालावधीपूर्वी सरकार पडले किंवा विधानसभा विसर्जित झाली तर लगेचच निवडणुकीत जाण्याची संधी मिळणार नाही. लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यपाल राजवट कायम राहावी या हेतूने प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही. स्वातंत्र्याच्या सुरुवातीला भारतात एकच निवडणूक प्रणाली होती. पण काही राज्य सरकारांनी लवकर निवडणुका घेतल्या. काही सरकारे पडली. एकल निवडणूक पद्धत पूर्णपणे गेली. अशा स्थितीत एकच निवडणूक घेणे कसे शक्य आहे, असा सवाल त्यांनी केला.
असा बदल घडवून आणण्यासाठी संसदेत दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. भाजपकडे संसदेत इतकी ताकद नाही. अशा स्थितीत सर्वपक्षीयांची बैठक बोलावून सर्वांना विश्वासात घेऊन ही कारवाई व्हायला हवी होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ प्रस्ताव मान्य करून काही होणार नाही. त्याऐवजी किमान महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे काम करावे,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments