लोकांना हैराण केलेल्या माकडांना अखेर अथणी वनविभाग व स्थानिक ग्रामपंचायतीने पकडले. विभागाच्या नेतृत्वाखाली त्यांना पकडून वनपरिक्षेत्रात नेऊन सोडण्यात आले .
बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील तांवशी गावात गेल्या महिनाभरापासून ३० हून अधिक माकडांनी ग्रामस्थांची शांतता भंग केली आहे. त्यांनी लोकांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. जनतेच्या गंभीर तक्रारी ऐकून अथणी उपविभागाच्या वन अधिकाऱ्यांनी कारवाई करून २३ हून अधिक माकडे जेरबंद केली.

नागप्पा आचरट्टी आणि मुरुगेश टक्का यांच्या पथकाने कारवाई करून माकडे पकडली.


Recent Comments