जलसंपदा विभाग, जल व भूमी व्यवस्थापन, धारवाड यांच्या वतीने एस.जी. बाळेकुंद्री टेक्निकल इन्स्टिट्यूट, बेळगाव येथे एस.जी.बाळेकुंद्री यांचा 101 वी जयंती साजरी करण्यात आली . यानिमित्ताने सिंचन व्यवस्थापन व जलसंपदा संवर्धन या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका डॉ.विजयालक्ष्मी बाळकुंद्री उपस्थित होत्या . व त्यांनी बाळेकुंद्री यांच्या जीवनपद्धतीचे पालन युवकांनी करावे असे सांगितले.

पाटील पुट्टप्पा म्हणाले की बाळेकुंद्री यांच्या अंगी प्रामाणिकपणा हा गुण होता.कर्नाटकच्या स्थापनेसाठी आपण सर्वजण आहोत,असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी यांनी सांगितले की , बाळेकुंद्री पाटबंधारे प्रकल्प सोडला असता तर उत्तर कर्नाटक हे वाळवंटच राहिले असते.त्यांनी हिडकल धरण, नवेलू तीर्थ धरण बांधून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला.विजापूर बिदर व गुलबर्गा येथील लोकांना बुडण्यापासून वाचवले.
कार्यशाळेत पूज्यश्री डॉ. तोंटद सिद्धराम महास्वामी, डॉ.विजयालक्ष्मी बाळेकुंद्री , डॉ. अल्लम प्रभू स्वामीजी, , आर.टी.जंगल, बी आर पटगुंदी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.


Recent Comments