लोकायुक्त ही राज्यातील स्वतंत्र, स्वायत्त संस्था आहे. तिचा छापा काँग्रेससाठी कोणतेही हत्यार ठरणार नाही असा दावा जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ यांनी केला.

चेन्नागिरी मतदारसंघातील भाजपचे आमदार मादाल विरुपाक्षप्पा यांच्या मुलावर लोकायुक्तांनी टाकलेल्या छाप्यासंदर्भात बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले, लोकायुक्त संघटना ही स्वतंत्र संस्था आहे, मी त्यावर बोलणार नाही. जिथे आरोप असतील तिथे तपास हे लोकायुक्तांचे कर्तव्य आहे. हा छापा काँग्रेससाठी कोणतेही हत्यार ठरणार नाही, खोटे बोलण्याशिवाय काँग्रेसचे दुसरे कोणतेही कर्तृत्व नाही.

पक्षात येऊन कोणी किंवा अधिकाऱ्याची चूक झाली तर खोटे आरोप करणे याशिवाय सिद्धरामय्या यांनी त्यांच्या आयुष्यात दुसरे काहीही साध्य केलेले नाही. सिद्धरामय्याच नव्हे, तर काँग्रेसचीही यापेक्षा वाईट अवस्था होईल, असे सांगत, सिद्धरामय्या यांनी चांगले काम केले तर गेल्या निवडणुकीत पराभूत का झाले? असा सवाल त्यांनी केला. लोकायुक्तांनी कोणावर छापा टाकला हे मला माहीत नाही, आमचे सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही, अशी त्यांनी सांगितले.


Recent Comments