आमच्या पंचमसाली समाजातील लोक पायदळी तुडवण्यावर आणि मोठे होण्यावर विश्वास ठेवत नाहीत, आम्ही वाढणे आणि वाढविणे यावर विश्वास ठेवतो. आम्ही पुढे असलेल्याना ढोसत नाही आणि मागे असलेल्याना लाथ मारत नाही. पण म्हणून आम्हाला हलक्यावर घेऊ नका असे सांगत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विरोधकांवर प्रहार केला आहे.

भालचंद्र जारकीहोळी यांच्या अरभावी मतदारसंघात पंचमसाली समाजाचे शक्ती प्रदर्शन पार पडले. कल्लोळीमध्ये पंचमसाली आरक्षणासाठी भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या भाषणात जारकीहोळी बंधूंना टोला लगावला. ‘जय पंचमसाली, राज्यात आम्हीच बलशाली’ असा जयघोष करून भाषणाला सुरुवात करणाऱ्या लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, माझे बंधू विधान परिषदेच्या निवडणुकीला उभे राहिल्यावर मला गोकाक आणि अरभावी या दोन मतदारसंघात येऊ न शकल्याची खंत होती.
पण तुमच्या समाजाचा धाकटा मुलगा संपूर्ण कर्नाटक राज्यात सर्वाधिक मते मिळवून विजयी झाला. इथल्या लोकांकडे बघितलं तर 440 व्होल्टेजचं वातावरण आहे. इतर समाजावर अन्याय न करता पंचमसाली समाजाला 2अ आरक्षण देऊ. आज आपला समाज खूप जागरूक आहे. आपल्या समाजाने निस्वार्थ भावनेने कष्ट घेतले आहेत. प्रत्येक वेळी नेते आमच्या समाजाचे राजकीय सहकार्य घेवून आम्हाला वापरून घेतात. बसवराज बोम्मई यांनी मागील अधिवेशनात सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बोम्मई साहेबांनी २ ए आरक्षण देण्याचा शब्द दिला आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळाची लवकरात लवकर बैठक बोलावून निर्णय घ्यावा अशी विनंती आपण माननीय मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही प्रत्येक मतदारसंघात 40 ते 50 हजारांच्या संख्येने आहोत. आम्ही लोणी बनवून विकतो आणि ताक पितो, असे भोळे लोक आमच्या समाजात आहेत. कित्तूर राणी चन्नम्मा यांच्यासोबत संगोळ्ळी रायण्णा पाहिजेतच. पंचमसाली समाजाचे वाल्मिकी, मुस्लिम, आंबेडकरी समाजाशी चांगले संबंध आहेत. आम्ही बसवण्णांच्या कुळातले. सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणे हे आपल्या समाजाचे मर्म आहे. आम्ही इतके दिवस इतर समाजातील लोकांना मदत केली आणि सहकार्य केले, पंचमसालीना एकदा आशीर्वाद द्या, असे अप्रत्यक्षपणे इरण्णा कडाडी यांना अरभावी मतदारसंघात तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करा असे सुचविले. अण्णा, धैर्य करा आणि पंचमसाळी समाजाचा आशीर्वाद घ्या, असे अप्रत्यक्षपणे सांगितले. भालचंद्र जारकीहोळी यांच्या विरोधात भाजपने तिकीट मागा असे अप्रत्यक्षपणे सांगत त्यांनी जारकीहोळी बंधूंना टोला लगावला.
पंचमसाली समाज ऊस पिकवतो, मी काटा मारत नाही. एक रोटी चार जणांनी वाटून खाल्ली. आमचा तुडवून वाढण्यावर विश्वास नाही, आम्ही वाढण्यावर आणि वाढवण्यावर विश्वास ठेवतो. परिषदेत काय झालं ते बघा. समाजाचे भले होवो, या सरकारने पंचमसाली समाजाला न्याय द्यावा. उद्या आमचे सरकार आले तरी मी हेच सांगेन. इतर समाजातील लोकांना सोबत घेतल्यास राजकीयदृष्ट्या आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. गेल्या 6 दिवसांपासून मी दररोज 20 ते 25 किलोमीटर चालले आहे. तुमच्या प्रेमाच्या हाकेने मी इथे आलो आहे. मी समाजासाठी चमेलीची फुले देते, माझ्यामुळे समाजाचे कोणतेही नुकसान होत नाही. ज्यांनी मला भावाच्या निवडणुकीत मदत केली त्या सर्वांचे आभार.
बसवमृत्युंजय स्वामीजी, भाजप आमदार बसवराज पाटील-यत्नाळ, माजी मंत्री विनय कुलकर्णी, ए. बी. पाटील, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, विजयानंद काशप्पनवर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह अनेक नेते आणि हजारो पंचमसाली लोक या मेळाव्यात सहभागी झाले होते.


Recent Comments