माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशभर शोकाची लाट आहे. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या आर्थिक सुधारणा, भारतीय अर्थव्यवस्थेला नवीन उभारी देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला अशा शब्दात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी श्रद्धांजली वाहिली.
डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या आधीच्या नापीक काळात, अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी अनेक कठीण निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक यशस्वी धोरणे राबवण्यात आली, ज्या आजही देशाच्या प्रगतीसाठी दिशा दाखवत आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ‘‘डॉ. मनमोहन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली देशाचा आर्थिक विकास केला गेला आणि त्यांचा सहभाग अविस्मरणीय आहे.’’
माजी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर आपली उपस्थिती निश्चित केली होती, ज्या माध्यमातून भारताला एक वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. मनमोहन सिंग यांनी आपल्या शांत स्वभावाने, प्रगल्भ ज्ञानाने आणि अतुलनीय दूरदृष्टीने देशाची अर्थव्यवस्था आणि शासनव्यवस्था नव्या उंचीवर नेली. मनमोहन सिंग यांनी आर्थिक तज्ज्ञ म्हणून केलेल्या सेवेने भारताला जागतिक क्षेत्रात उंच केले.
सर्वोत्कृष्ट अर्थतज्ञ आणि शिक्षणतज्ञ अशी ओळख असलेले मनमोहन सिंग यांना जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट पुरस्कारही मिळाले. ते सलग 10 वर्षे भारताचे पंतप्रधान होते आणि हे पद भूषवणारे ते शीख समुदायातील पहिले व्यक्ती होते. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आधारची अंमलबजावणी, रोजगार हमी, माहितीचा अधिकार कायदा, अमेरिकेसोबत नागरी अणु करार यासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांच्या काळात कार्यान्वित झाल्याची आठवण मंत्र्यांनी सांगितली.


Recent Comments