Chikkodi

केंद्र सरकारने 23 विधेयके मंजूर करून जनतेचे भले केले : खासदार अण्णासाहेब जोल्ले

Share

संसदेच्या इतिहासात लोकसभेचे अधिवेशन यशस्वीपणे पार पडले. त्यात केंद्र सरकारने सुमारे 23 विधेयके मंजूर करून देशातील जनतेचे भले केले आहे असे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले.

चिक्कोडी येथील खासदार कार्यालयात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जुन्या ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये सुधारणा करून लोकांना हवे तसे कायदे सुलभ करण्यासाठी सुमारे 23 विधेयके मंजूर करण्यात आली आहेत.
ते म्हणाले की, संसदेच्या अधिवेशनात सुमारे दोन तास प्रदीर्घ भाषण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अनेक समस्यांना तोंड देत विरोधकांना चोख उत्तर दिले.

विरोधी पक्षनेत्यांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित करून उगाचच संसदेचा वेळ खराब करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, जे काही प्रश्न उपस्थित केले गेले, त्याला आमच्या मंत्र्यांनी समर्थपणे उत्तर दिले.

संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या मुद्द्याचा उल्लेख करत मणिपूरचा प्रश्न एकत्र सोडवूया असे सांगितले. मात्र, विरोधी पक्षांनी गदारोळ केला तरी उपयोग नाही, असे ते म्हणाले.

यावेळी नगरपालिका उपाध्यक्ष संजय कवटगीमठ, सिद्धप्पा धनगर, विजय राऊत आदी उपस्थित होते.

 

Tags: