माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली पंचरत्न रथयात्रेचा तिसरा टप्पा १० फेब्रुवारीला बेळगावात येणार आहे. जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांनी सांगितले .
शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 10 फेब्रुवारी रोजी ते खानापूर येथे ग्रामवास्तव्य करणार आहेत. तेथून त्यांचा ईटगी येथे मेळावा आणि रायबाग व कुडची येथे मेळावा होणार आहे. तसेच ते म्हणाले की, बैलहोंगल येथे ग्रामवास्तव्यानंतर , भव्य अधिवेशन आयोजित केले जात आहे.
जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष सीएम इब्राहिम यांच्यासह अनेक आमदार या पंचरत्न यात्रेला उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंचरत्न यात्रा ही एक जेडीएस एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून यात्रा काढत आहे. शिक्षण, रुग्णालय, पाणी पुरवठा योजना , स्वयंसहाय्यता संस्था, महिलांना कर्जमाफी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, तरुणांना प्राधान्य देणे, सबलीकरण या प्रमुख उद्देशाने पंचरत्न यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदर , माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली पंचरत्न यात्रा १० फेब्रुवारीला बेळगावमध्ये येणार आहे .


Recent Comments