Belagavi

हरिहर पंचमसाली पीठ म्हणजे पेमेंट मठ : यत्नाळ यांची जहरी टीका

Share

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना हरिहर पंचमसाली पीठात न्या किंवा कुठेही स्मशानात, तिथे गेले तर काय क्रांती होणार आहे? असा सवाल करत तो पेमेंट मठ असल्याची टीका भाजपचे विजापुरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केली.

बेळगावात गुरुवारी गांधी भवनात पत्रकारांशी बोलताना यत्नाळ यांनी, हरिहर पंचमसाली पीठाचा अभ्यास पूर्ण झाला आहे. त्याच्यामागील मंत्र्यांचा अभ्यास पूर्ण झाला आहे असे सांगत अप्रत्यक्षपणे वचनानंद स्वामीजी आणि मंत्री मुरुगेश निरानी यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला.

२०२३ च्या विधानसभा निवडणुकीत मी विजापूरमधून भाजपकडून निवडणूक लढवणार आहे. मी भाजपचा राहण्याचा आणि पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. आत्तापर्यंत मी बोम्मईना खोलीत सांगायचो की पंचमसाली समाजाची फसवणूक केली तर पक्ष टिकणार नाही, ते आता उघडपणे सांगेन, असे सांगत त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिले.
आरक्षण जाहीर केले नसते तर बोम्मयी हे भाजपचे शेवटचे मुख्यमंत्री झाले असते का, या प्रश्नाला उत्तर देताना मागास आयोगाने गेली दोन वर्षे काय केले, असे ते म्हणाले. आम्ही फक्त एका समाजासाठी मागत नाही. गवळी समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा, असे आम्ही म्हटले आहे. एवढं बोलूनही त्यांनी सगळ्यांना संभ्रमात ठेवलं असा आरोप त्यांनी केला.

पंचमसाली समाजाला २ ए आरक्षण न देण्याबाबत सरकारने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत किती फरकाने विजय मिळवला? ते म्हणाले, बेळगाव विधानपरिषद निवडणुकीत, मुस्कीत काय झाले, 2023 मध्ये राज्यात परत पक्षाची सत्ता यावी आणि 150 मतदारसंघ मिळावेत, असा माझा हेतू आहे. मात्र भाजपच्या काही नेत्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. मला मंत्री व्हायचे आहे. माझा मुलगा आमदार झाला पाहिजे, या करारात ते पक्षाशी गद्दारी करत आहेत. मात्र मी ते करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
करोडो कमावणारा आणि परदेशात पैसा गुंतवत, शेतकरी समृद्ध करणे हेच माझे उद्दिष्ट असल्याचे सांगणारा तो माजी मुख्यमंत्री आहे त्यांचे म्हणणे आहे. काही माध्यम लगेचच त्यांच्यामुळेच क्रांती होणार म्हणतात. या प्रसारमाध्यमांनी आधी सत्य काय ते पहावे असा सल्ला त्यांनी दिला.

पंचमसाली समाजासाठी 2अ आरक्षण नसल्याबाबत पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, शिकारीपूरच्या लोकांकडे थ्री डी आहे. बोम्मई त्यांच्या पाठीमागे लागले तर ते योग्य होणार नाही असा इशारा यत्नाळ यांनी दिला.

एकंदर, कोणाचेही नाव न घेताही यत्नाळ यांनी वचनानंद स्वामीजी, मंत्री मुरुगेश निराणी आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर नथीआडून तिर मारल्याचे यावेळी दिसून आले.

Tags: