पराभवाच्या भीतीने भाजप आणि काँग्रेसने जिल्हा व तालुका पंचायतीच्या निवडणुका घेतल्या नाहीत, असा आरोप आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भोगेश सोल्लापूर यांनी केला आहे.
विजापूर शहरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांवरून दोन्ही सरकारांवर जोरदार टीका केली. विजापूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना भोगेश सोल्लापूर यांनी भाजप आणि काँग्रेसच्या धोरणांचा निषेध केला. गेल्या दहा वर्षांपासून जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुका न घेता लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. दोन्ही पक्षांना निवडणुकीत पराभव होण्याची भीती वाटत असल्यानेच ही प्रक्रिया जाणीवपूर्वक लांबणीवर टाकण्यात आली आहे, असे भोगेश सोल्लापूर यांनी म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर आता सरकारने प्रवर्ग निश्चितीची तयारी दर्शवली असून जून अखेरपर्यंत निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रक्रियेवर आम आदमी पक्षाचे बारीक लक्ष असून जनतेच्या हक्कासाठी ‘आप’ लढा देणार असल्याची प्रतिक्रिया भोगेश सोल्लापूर यांनी दिली. या पत्रकार परिषदेला आम आदमी पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments