Belagavi

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बेळगावच्या भाग्यश्री उळागड्डी यांचे यश

Share

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत बेळगावच्या शासकीय अध्यापक शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी भाग्यश्री उळागड्डी हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

बेंगळुरू येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून तिने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय मतदार दिन-२०२६ निमित्त पदवी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये बेळगावची बी.एड. विद्यार्थिनी भाग्यश्री उळागड्डी हिने जिल्हा स्तरावर प्रथम आणि राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला. २५ जानेवारी रोजी बेंगळुरू येथे झालेल्या समारंभात राज्यपाल महोदयांच्या हस्ते तिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

भाग्यश्री या बेळगावच्या शासकीय अध्यापक शिक्षण महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असून, त्यांच्या या यशाबद्दल राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या कुलसचिवांनी अभिनंदन केले आहे.

Tags: