Vijayapura

सिद्धरामय्या सरकारचा लवकरच अंत होईल : आमदार यत्नाळ यांचा सिद्धरामय्या सरकारवर प्रहार

Share

राज्यातील सिद्धरामय्या सरकारच्या काळात विकासाची सर्व कामे थांबली असून हे सरकार केवळ केंद्र सरकारवर टीका करण्यात मग्न असल्याचा आरोप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला आहे. खासदार तेजस्वी सूर्या यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करत त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

राज्यात सध्या विकासाचा कोणताही दृष्टिकोन शिल्लक नसून सरकार केवळ आपली अपयशे लपवण्यासाठी जनतेला चुकीची माहिती देत असल्याचे बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी म्हटले.

आलमट्टी प्रकल्पासाठी कोणताही निधी दिला नसून कावेरी प्रश्नावर बोलण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. केवळ गॅरंटी योजनांचा जप करत केंद्रावर टीका करणे हेच या सरकारचे एकमेव काम असल्याची टीका बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केली.

केवळ अल्पसंख्यांकांचे कर्ज माफ केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत, दलित आणि मागासवर्गीयांनी तुम्हाला मतदान केले नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कर्जमाफी करायची असेल तर ती सर्व घटकांना समान पद्धतीने लागू करायला हवी अशी मागणी बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केली.

राहुल गांधी परदेशात जाऊन आपल्याच देशाविरुद्ध बोलतात, अशी व्यक्ती विरोधी पक्षनेता असणे हे दुर्दैवी असल्याची खोचक टिप्पणी बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केली.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा दिल्ली दौरा म्हणजे राज्य सरकारच्या पतनाचा प्रवास असल्याची टीका करत, आता या सरकारचा अंत जवळ आल्याचा दावा बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला.

Tags: