बेळगाव तालुक्यातील निलजी येथे आयोजित विशेष जनसंपर्क सभेत राज्यसभा खासदार ईरण्णा कडाडी यांनी नरेगा कामगारांशी थेट संवाद साधला. केंद्र सरकारने न्यायव्यवस्थेत केलेल्या आमूलाग्र बदलांची माहिती यावेळी त्यांनी मजुरांना दिली.


बेळगाव तालुक्यातील निलजी गावात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या कामगारांच्या तक्रारी खासदार ईरण्णा कडाडी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी भारतीय न्याय संहितेतील नवीन तरतुदींबाबत मजुरांमध्ये जनजागृती केली. सामान्य नागरिकांना कायद्याचे संरक्षण कसे प्राप्त होते आणि नवीन सुधारणांमुळे कायदेशीर प्रक्रिया कशी सोपी झाली आहे, याचे सोप्या भाषेत विश्लेषण ईरण्णा कडाडी यांनी केले.
चर्चेदरम्यान कामगारांच्या उपजीविकेतील संघर्षावर भाष्य करताना केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे ईरण्णा कडाडी यांनी सांगितले. ग्रामीण भागातील श्रमिकांनी केवळ कामापुरते मर्यादित न राहता देशाच्या कायद्यातील बदलांबाबतही जागरूक राहावे, असे आवाहन ईरण्णा कडाडी यांनी केले.


Recent Comments