बागलकोट जिल्ह्यातील इनामदार साखर कारखान्यात झालेल्या भीषण बॉयलर स्फोटात बनहट्टी येथील अक्षय चोपडे (४५) या इंजिनिअरचा बळी गेला आहे. अक्षय हे गेल्या दीड वर्षांपासून या कारखान्यात ज्युनियर इंजिनिअर म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या कमाईवरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता.

मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या अक्षय यांना या क्षेत्रातील २५ वर्षांचा मोठा अनुभव होता. आपल्या ४० हजार रुपये पगारातून ते वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी समर्थपणे पेलत होते. त्यांच्या निधनामुळे दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा आणि वृद्ध पालकांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दुर्घटनेमुळे चोपडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Recent Comments