Belagavi

मलप्रभा साखर कारखान्याकडून एक लाख क्विंटल साखरेचे विक्रमी उत्पादन

Share

कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्याने (राणी शुगर्स) यावर्षी साखरेच्या उत्पादनात मोठी झेप घेतली आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या गाळप हंगामात आतापर्यंत एक लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, त्यानिमित्त कारखाना व्यवस्थापन आणि कामगारांच्या वतीने विशेष पूजा करण्यात आली.

कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मोहन हिरेमठ यांनी माहिती दिली की, १७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गाळपात आतापर्यंत एक लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी बंद पडण्याच्या स्थितीत असलेल्या कारखान्यात यंदा शेतकरी आणि कामगारांमुळे सकारात्मक बदल झाला असून, साखरेचा उतारा देखील चांगला मिळत आहे. यावर्षी कामगारांचे पगार आणि शेतकऱ्यांची थकीत बिले पूर्णपणे दिली जातील, तसेच पुढील तीन वर्षांत कारखान्याचा मोठा विस्तार करण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला डीसीसी बँकेचे संचालक नानासाहेब पाटील, कारखान्याचे संचालक मंडळ आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: