कृष्णा नदीसह दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांची पाणी पातळी कमी होणार असल्यामुळे पूरस्थितीची भीती बाळगू नका, असे चिकोडीचे उपजिल्हाधिकारी सुभाष संपगावी यांनी लोकांना सांगितले आहे.

चिकोडी तालुक्यातील प्रसिद्ध येडूर गावातील वीरभद्रेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्याने, पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे नद्यांमधील पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. त्यामुळे पाणीपातळी कमी होईल. लोकांनी नदीपाशी आंघोळ करण्यासाठी, कपडे धुण्यासाठी किंवा वाहने धुण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. उपजिल्हाधिकारी सुभाष संपगावी यांनी सांगितले की, “आज नद्यांची पाणी पातळी कमी होईल. लोकांनी पुरामुळे घाबरण्याची गरज नाही.”
वीरभद्रेश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून, अमावस्या असल्यामुळे भाविकांनी दूरूनच देवाचे दर्शन घ्यावे. तसेच, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोटी आणि काळजी केंद्रे यांसारख्या उपाययोजना केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.


Recent Comments