दहावी परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेल्या जिल्ह्यांच्या डीडीपीआय अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत. नोटीसचे उत्तर समाधानकारक नसेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना दिले.

विधानसौध येथील परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या दुसऱ्या दिवसाच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी उपमुख्यमंत्र्यांवर आणि इतर मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या गंभीरतेवर भर देत, अधिकाऱ्यांच्या उशिरा येण्याबद्दल तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीतबद्दलही नाराजी व्यक्त करत रिकाम्या खुर्चीकडे बोट दाखवत फटकारली.
पुढील कार्यवाहीत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शालेय शिक्षण विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. दहावीचा निकाल कमी लागण्यामागे शिक्षकांची कमतरता किंवा कर्मचाऱ्यांची कमतरता ही कारणे देऊ नका. दक्षिण कन्नड आणि इतर काही जिल्ह्यांमध्येच चांगले निकाल लागत आहेत. शिक्षक आणि डीडीपीआय यांनी तळमळीने काम केल्यास सर्वत्र चांगले निकाल येतील, असे ते म्हणाले. दहावी परीक्षेमध्ये ६० टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलेल्या जिल्ह्यांच्या डीडीपीआय अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आणि त्यांचे उत्तर समाधानकारक नसल्यास कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पुन्हा दिले.
Recent Comments