कर्नाटक सरकारचे दिल्लीचे माजी विशेष प्रतिनिधी, शंकरगौडा पाटील यांनी व्हिडिओ निवेदनाद्वारे पंचमसाली आरक्षण रॅलीवेळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठी चार्ज संदर्भात निषेध व्यक्त केला आहे .
पंचमसाली आंदोलकांवर सरकारने लाठीमार केला, हे निंदनीय आहे. स्वामीजींनी आंदोलक आणि पोलिसांना शांतता राखण्याचे सांगूनही पोलिसांनी लाठीमार करून हिटलरशाहीचे धोरण दाखवले आहे. असे हल्ले करून सरकार संघर्ष दडपण्याचा प्रयत्न करत असेल तर ते निषेधार्ह आहे. शासनाने पंचमसाली श्री, व पंचमसाळी समाजाची तात्काळ माफी मागावी. लवकरच पंचमसाली समाजासाठी 2अ आरक्षणाची मागणी केली.


Recent Comments