शिक्षण कधीच थांबत नाही. ते सतत चालू असते. आव्हानांना सामोरे जात उत्कृष्ट स्थानावर पोहोचून उज्जवल भविष्य घडवण्याचे आवाहन उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी.सुधाकर यांनी केले.
राणी चन्नम्मा विद्यापीठाचा १२ वा वार्षिक दीक्षांत समारंभ व्हीटीयूच्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात संपन्न झाला. समारंभाचे अध्यक्ष , राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलपती प्रो. सी.एम. त्यागराज यांनी मार्गदर्शन केले. या समारंभात माजी उच्च अधिकारी आणि यू.एन.अन्न व कृषी संस्था मगलोरचे डॉ. इड्या करूणासागर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेले , उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर म्हणाले, “विद्यार्थ्यांनी त्यांच्या आगामी जीवनातील प्रत्येक टप्प्याला कधीकधी जास्त गंभीरतेने विचार करत जगा. जगात प्रत्येक गोष्ट एकमेकाशी संबंधित आहे. तुम्हाला ज्या प्रकारे आव्हानांचा सामना करायचा आहे त्यासाठी विविध दृष्टिकोनातून विचार करा. सद्भावनेने, मुक्त विचारांसह आणि सर्व स्तरातील लोकांशी सहयोग करून यश मिळवा.
तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, पण ते आव्हानांनी भरलेलं आहे. प्रत्येक आव्हानाचा तुम्ही धैर्याने आणि आशावादाने सामना करा. शिक्षणाची कास सोडू नका. उत्तम करिअर सुरू करा, आणि राणी चन्नम्मा विद्यापीठामध्ये मिळवलेल्या मूल्यांना नेहमीच प्रामाणिकपणे जोपासा. या डिजिटल युगात, शिक्षण कधीच थांबत नाही, हे लक्षात ठेवा.”

कला, उद्योजकता, सामाजिक सेवा आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पं. एस. बालेश भजन्त्री यांना कला क्षेत्रातील, गोपाल जिनगौड यांना उद्योजकता आणि सामाजिक सेवेत, तसेच गोपाल होसुर यांना नागरिक क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. विविध विभागांतील पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.


Recent Comments