देशासाठी प्राणाची आहुती देऊन सीमेवर अहोरात्र सेवा करून निवृत्त झालेले सैनिक तीर्थगौडा शंकरगौडा पाटील यांचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.
बेळगाव तालुक्यातील अवरादी गावातील वडीलधारी मंडळी, तरुण, महिला आणि विद्यार्थ्यांनी तीर्थगौडा शंकरगौडा पाटील या निवृत्त सैनिकाचे भव्य स्वागत केले.
निवृत्त सैनिक म्हणून मी देशाच्या सर्व सीमावर्ती भागात सेवा बजावली आहे. लोकांनी दाखविलेल्या प्रेमाचा मला अभिमान आहे, अशा भावना तीर्थगौडा शंकरगौडा पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पीएसआय प्रवीण गंगोळ यावेळी बोलताना म्हणाले, कि सीमेवर रक्षण करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळातही सैनिक निस्वार्थीपणे सेवा बजावत असतात. समाजाने त्यांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात उळवैय्या हिरेमठ, शिवानंद गुडागनट्टी, पीएसआय प्रवीण गंगोळ, दोडगौडा पाटील यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि महिलावर्गासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments