सिद्धरामय्या यांनी सहानुभूती मिळविण्यासाठी जागा परत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी टीका केली.
बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत बोलताना बी.वाय. विजयेंद्र म्हणाले, मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणि सहानुभूती मिळविण्यासाठी जागा परत करण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्यांनी ढोंगीपणा सोडून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्यापूर्वी राज्यपालांची माफी मागावी. तक्रारदार स्नेहमाई कृष्णा यांना डीजीपींनी योग्य सुरक्षा पुरवावी, असे ते म्हणाले.आम्ही तासभर धरणे दिल्यानंतर सिद्धरामय्या पळून गेले. वाल्मिकी महामंडळात घोटाळा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मान्य केले. काल रात्री झालेल्या एका मोठ्या घडामोडीत आपल्या धर्मपत्नीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष गेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या मुलाची दखल न घेता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातून पत्र लिहिण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेली तक्रार, राज्यपालांनी दिलेली परवानगी यावर न्यायालयाचा आदेश आधारित आहे. सिद्धरामय्या यांनी जागा परत करण्याचा निर्णय घेतला म्हणजे त्यांना कायद्याच्या कचाट्यातून सुटावे लागेल असे नाही. राजकीय सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांनी उचललेल्या या पावलांमुळे त्यांच्याच पक्षातील अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. त्यांनी जागा परत करणे हे राजकीय नाटक असल्याची टीका विजयेंद्र यांनी केली.


Recent Comments