राज्यात होत असलेल्या दंगलीमागे भाजपचा हात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे. म्हैसूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, नागमंगल आणि दावणगेरे येथे गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या दंगली आणि दगडफेकीमागे भाजपचा हात आहे. भाजप जातीयवादी असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
यंदा साठ हजार गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. दावणगेरे आणि नागमंगल येथे झालेल्या दंगलीप्रकणी पोलिसांचे कर्तव्यात दुर्लक्ष झाल्याने डीवायएसपीला निलंबित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेची माहिती गृहमंत्र्यांनी आधीच दिली असून योग्य ती कारवाई केली आहे. पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला आहे. या घटनेप्रकरणी नागमंगल येथील दोन पोलिसांना यापूर्वीच निलंबित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कुमारस्वामी यांच्यावरील डिनोटिफिकेशन संदर्भातील आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले, मंत्र्यांनी काल या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जाहीर केली. मी ती कागदपत्रे पाहिली नाहीत. या जमिनीची नोंद कुमारस्वामी यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. याचा तपास केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आमदार मुनीरत्न यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून आज काही मंत्री व आमदारांनी माझी भेट घेऊन हे प्रकरण एसआयटीकडे सोपवण्याची विनंती केली. याबाबत गृहमंत्री जी परमेश्वर यांच्याशी बोलणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
केपीएससी च्या गॅझेटेड प्रोबेशनरी पदांच्या पुनर्परीक्षेची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी महत्वपूर्ण माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कॉन्स्टेबल पदांची वयोमर्यादा 27 वरून 33 वर्षे करण्याच्या मागणीबाबत बोलताना ते म्हणाले की, याबाबत एककलमी निर्णय घेण्यासाठी गृहमंत्र्यांना कळवले आहे.
यंदाच्या म्हैसूर दसऱ्याच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध आणि ज्येष्ठ लेखक एच.पी. नागराजय्या यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Recent Comments