मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात कर्नाटकला काहीही दिले गेले नसल्याच्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बेंगळुरूमध्ये येऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना प्रत्युत्तर दिले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आज बंगळुरू येथे आगमन झाले, त्यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पात कर्नाटकला दिलेल्या योजनांची माहिती दिली. कर्नाटकातून राज्यसभेवर निवडून आलेल्या मंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्याची फसवणूक केल्याचा आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी केंद्रीय अर्थसंकल्पात 7 शहरे स्मार्ट सिटी- वर्क ऑर्डर, जानेवारी 2020-24 बोईंग इंडिया बिग कॅम्पस, 1600 कोटी रुपयांमध्ये 4600 किमी रस्त्यांचे बांधकाम, 1 लाख कोटी रुपयांमध्ये महामार्ग विकास, भारत माला परियोजना , बंगळुरू चेन्नई, रिंग रोड, सोलापूर कॉरिडॉर, उडान प्रकल्प, नवीन शिमोगा विमानतळ, हुबळी-बेळगाव नवीन टर्मिनल बांधकाम प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे.
आता कर्नाटक आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करत असून पेट्रोलचे दर, दुधाचे दर, मालमत्ता कर, मुद्रांक शुल्क, वाहन परवाना या सर्वच दरात वाढ करून जनतेवर बोजा टाकला आहे. राज्यातील कायदेशीर व्यवस्था ढासळली आहे. एकापाठोपाठ एक घोटाळा करून सरकारने अनुसूचित जाती-जमाती विकास महामंडळाच्या निधीचाही गैरवापर केला आहे, असे सांगत त्यांनी सरकारवर सडकून टीका केली.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र उपस्थित होते.
Recent Comments