अथणी शहरातील सिद्धेश्वर सभा भवन येथे 44 व्या शेतकरी हुतात्मा दिनाचे आयोजन करण्यात आले होते . हुतात्मा शेतकऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोपट्याला पाणी देऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. .

कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष राघवेंद्र नाईक व तालुकाध्यक्ष मुबारक तांबुळी यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
दरम्यान, व्यासपीठावरून संबोधित करताना जिल्हा नेते प्रकाश पुजारी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे मात्र गरीब शेतकऱ्यांना आता स्वातंत्र्य मिळालेले नाही असा संताप व्यक्त केला. .


Recent Comments