Belagavi

वाढत्या लोकसंख्येचा मानवी जीवनावर होतो परिणाम

Share

लोकसंख्या वाढली तरी जमिनीचा आकार वाढत नाही. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे असे आ . राजू सेठ म्हणाले .  बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, बेळगाव वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, जिल्हा आयुष विभाग व विविध विभाग व सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.

बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून भाषण केले. ते म्हणाले की, लोकसंख्या वाढल्याने जमिनीचा आकार वाढत नाही, त्याचे मानवी जीवनावर अनेक परिणाम होतात. प्रास्ताविकात जिल्हा कुटुंब कल्याण अधिकारी डॉ.विश्वनाथ भोवी म्हणाले की, लोकसंख्या वाढल्याने देशाचा आर्थिक विकासही मंदावतो. अन्न, निवारा, वस्त्र, जमीन, घर, खनिजांचा तुटवडा, वनस्पती संपत्तीचा नाश, गरिबी, पाणीटंचाई, सामाजिक समता, रोगराई वाढेल, असे ते म्हणाले.

कुटुंब कल्याण कार्यक्रमात चांगली सेवा देणाऱ्या जिल्हा वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय आरोग्य शिक्षणाधिकारी, नर्सिंग अधिकारी, प्राथमिक आरोग्य सेवा अधिकारी आणि आशा वर्कर्स यांचा विभागातर्फे सत्कार करून सन्मानचिन्ह देण्यात आले.

Tags: