Hukkeri

मठाधीशानी राजकारण सोडून मार्गदर्शन करावे – आमदार निखिल कत्ती

Share

हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती यांनी मत व्यक्त केले की, मठाधीशानी राजकारण सोडून मार्गदर्शन करणे चांगले आहे.
आज हुक्केरी शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बदलाबाबत काही मठाधीश विधाने करत आहेत हे वाजवी नाही.
राज्याच्या मुख्यमंत्री बदलाबाबत पत्रकार अनेक शक्यता मांडत आहे .

त्यांनी याबद्दल माझे मत विचारले असता, मुख्यमंत्री हे आमच्या पक्षाचे नाहीत , ते काँग्रेस पक्षाचा आहे, मला त्यांच्या पक्षाच्या नेत्यांमधील मतभेद माहित नाहीत, मी त्यावर भाष्य करणार नाही, पण खेदाची गोष्ट आहे की. या सरकारकडून निधी नाही, मतदारसंघात विकासकामे होत नाहीत, असे असताना काही मठाधीशच भक्तांना मार्गदर्शन करण्याऐवजी राजकारण करत आहेत, असे ते म्हणाले.

Tags: