Belagavi

मुख्यमंत्री बदल हवा कशाला? : आम. आर. व्ही. देशपांडेंचा सवाल

Share

राज्यात सिध्दरामय्यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर आहे. राजकारणात पक्षात मतभेद असतात याचा अर्थ मुख्यमंत्री बदलतील असा नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ आमदार आर.व्ही.देशपांडे यांनी व्यक्त केली.

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना आम. आर. व्ही. देशपांडे यांनी मुख्यमंत्री पद बदलासंदर्भात सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री बदल हा विषय जाहीरपणे चर्चा करण्याचा विषय नाही. सिद्धरामय्या हेच आमचे मुख्यमंत्री आहेत, चांगले राज्यकर्ते आहेत. ते मुख्यमंत्रीपदी कार्यरत असताना मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच येत नाही, मुख्यमंत्री बदल हवाच कशाला असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Tags: