Karnataka CM

भाजप आणि नरेंद्र मोदींचा सामना करण्यासाठी राहुल गांधी हे योग्य व्यक्ती : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारली हे देशाच्या हितासाठी चांगले आहे, असे मत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले.
विधानसौध येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले कि , राहुल गांधी यांनी लोकसभेच्या विरोधीपक्ष नेण्याचे पद स्वीकारावे असेही मी सुचवले आहे. भाजप आणि नरेंद्र मोदींचा सामना करायचा असेल तर तुम्ही विरोधी पक्षनेते व्हा, असा आग्रह मी आणि कार्यकारिणीने धरला. राहुल गांधींनी ही जबाबदारी स्वीकारली हे देशाच्या हिताचे आहे. मला त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करायचे आहे.

दुधाच्या दरात वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी याच वेळी दूध उत्पादन ९० लाख लिटर होते. आता 99 लाखांहून लिटरहुन अधिक. शेतकऱ्यांकडून दूध घेऊन ते विकावे लागते. अर्ध्या लिटरच्या पॅकेटमध्ये50 मिली जास्त तयार करण्यात आल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आणि प्रमाणानुसार किंमतीनुसार 2.10 रुपये निश्चित केले आहेत. दुधाच्या दरात वाढ झालेली नाही. दुधाचे उत्पादन जास्त असल्याने अधिक दर देण्यात आला असून त्यानुसार भाव ठरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हॉटेलमालक संघटनेने बैठक घेऊन कॉफी आणि चहाचे दर वाढवले या पत्रकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना , ते तरी कसे वाढवणार, दुधाचे भाव वाढले तरचते वाढवणार असे उत्तर दिले .

संसद सदस्यांच्या बैठकीसाठी दिल्लीला जाण्याबाबत पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, मी जाताना सांगेन.

Tags: