बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावात आज बकरी ईदच्या निमित्ताने निमित्ताने गोहत्या केल्याचे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणले आहे .
![](https://marathi.innewsbelgaum.com/wp-content/uploads/2024/04/SHIV-OM-copy.jpg)
गोहत्या हा ऐतिहासिकदृष्ट्या भारतात निषिद्ध विषय आहे. कारण हिंदू धर्मात गाय ही पूजनीय आहे. गाय माता ही एक आदरणीय प्राणी आहे आणि हिंदू संस्कृतीत दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर दैवी कार्यात वापर केला जातो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 48 मध्ये राज्यांना गायी आणि वासरे आणि इतर दूध आणि पशुधन यांच्या कत्तलीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. 26 ऑक्टोबर 2005 रोजी, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात भारतातील विविध राज्य सरकारांनी लागू केलेल्या गोहत्या विरोधी कायद्यांची घटनात्मक वैधता कायम ठेवली.
परंतु बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील नागराळ गावात आज बकरी ईदच्या निमित्ताने गोहत्या केल्याचे रायबाग बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक रायबाग पोलीस ठाण्याला कळवले . घटनास्थळाची पाहणी केली असता गाईची कत्तल केल्याचे आढळून आले व जागेचा पंचनामा करून गायीचा मृतदेह पंचनामा करण्यासाठी रायबाग पशु रुग्णालयात नेण्यात आला .
गायींची कत्तल करणारे फरार झाले असून गुन्हा दाखल करून गोहत्या करणाऱ्यांना अटक होणार का, हे पाहावे लागेल.
Recent Comments