Banglore

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पक्षाच्या व्यासपीठावर करावी चर्चा : आ . लक्ष्मण सवदी

Share

माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी या मतदारसंघातील पारंपरिक मतांची माहिती घ्यावी. निवडणुकीत त्यांच्या चुकीमुळे उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्याचा आरोप त्यांनी केला आहे . याबाबत त्यानी पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा करावी असा पलटवार .माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी जारकीहोळी यांच्यावर केला

अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी , मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या लोकसभा निवडणुकीत अथणीत भाजपच्या आघाडीबाबत केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला, पण 2019 च्या पोटनिवडणुकीत भाजपने आघाडी घेतली. योग्यवेळी बदल केले जातील, असे ते म्हणाले.

संबंधित मतदारसंघात पारंपरिक मते असतील. काही वेळा पक्षीय आणि वैयक्तिक आधारावर मतदान केले जाते. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले की, गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता सात हजार मते मायनस झाली आहेत.

सतीश जारकीहोळी निवडणुकीत अपयशी ठरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अथणीत मायनस आहे. कमी मतदानास काही त्रुटी कारणीभूत ठरल्या. त्यावर खुली चर्चा न करता पक्षाच्या व्यासपीठावर चर्चा होईल, असे मत लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केले.

Tags: