विजयपूर शहरातील तीन मुले बेपत्ता झाली आणि नंतर जवळच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात मृतावस्थेत सापडल्याच्या दुःखद घटनेबाबत,राज्य बाल हक्क आयोगाने गुन्हा दाखल केला आहे .
राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य शशिधर कोसंबे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली . आमच्या जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सांगितले आणि निष्काळजीपणामुळे झालेल्या या मुलांचा मृत्यू झाल्याचा संपूर्ण अहवाल देण्यासाठी अहवाल मागितला. पुढे बोलतांना, अधिकारी कोणीही, कोणत्या कारणासाठी दोषी आहेत , याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यासाठी शासनस्तरावर पत्रव्यवहार करू.
त्याचप्रमाणे, आम्ही संबंधित विभागाकडून त्या मुलांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीची शिफारस करतो, असे राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य शशिधर कोसंबे यांनी बंगळुरू येथून प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रसिद्ध केले.


Recent Comments