अर्जुनगी येथील रुक्माव्वा दुंडप्पा बडगी (५२) या महिला शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील अर्जुनगी गावात ही घटना घडली आहे . बबलेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला . आरोग्य अधिकाऱ्यांनी आत्महत्येच्या ठिकाणी पोहोचून मृत्यूची माहिती गोळा केली. त्यांनी घेतलेले 10 लाखांचे कर्ज फेडता न आल्याने तिने आत्महत्या केली.
बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील गडियाल गावात त्यांची जमीन आहे.गडियाल प्राथमिक कृषी सहकारी बँकेत १ लाख, विजयपूर एचडीपीसी बँकेत अडीच लाख. बबलेश्वरच्या चैतन्य फायनान्स मधून कर्ज घेतले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे. राज्य सरकारने आत्महत्या केलेल्या शेतकरी महिलेला न्याय द्यावा व कर्जबाजारीपणाने आत्महत्या केलेल्या रुक्माव्वा बडगीच्या कुटुंबाला भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Recent Comments