Belagavi

पैसा आणि सत्तेच्या जोरावर लोकशाही चालत नाही :जगदीश शेट्टर

Share

पैसे आणि सत्तेच्या जोरावर लोकशाही चालत नाही . काही पक्षांनी पैसे वाटप करून मतदारांना वळवण्याचे काम केले . मात्र मतदारांनी त्यांना चोख उत्तर दिल्याचे जगदीश शेट्टर यांनी सांगितले .

निवडणुकीची धावपळ संपल्याने भाजपचे लोकसभेचे उमेदवार जगदीश शेट्टर रिलॅक्स झाले आहेत . महिनाभर चाललेल्या प्रचार धुमाळीनंतर निवडणुकीचे मतदान सुरळीत पार पडल्याने ते आता थोडे निवांत झाले आहेत . आता ४ जूनच्या निकालाकडे लक्ष लागले आहे .

बेळगावातील लक्ष्मी कॉम्लेक्सच्या कार्यालयात बोलताना जगदीश शेट्टर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघात विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला असून, काही पक्षांनी पैसे वाटण्याशिवाय मतदारांना आमिष दाखवून त्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला . ते पैसे वाटपावर जिंकण्याच्या भ्रमात आहेत. मात्र, मतदारांनी त्याला नाकारून चोख उत्तर दिले. पैसा आणि सत्तेच्या जोरावर लोकशाही चालू शकत नाही, असे ते म्हणाले.

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत, अशी जनतेची इच्छा आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाचा निवडणुकीवर प्रभाव पडला नाही, भाजप कार्यकर्त्यांनी सर्वांनी भाजपला पाठिंबा दिल्याचे सांगितले, मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी सर्वांनाच इच्छा होती, पराभवाच्या भीतीने आणि निराशेने काहींनी पैसे वाटल्याची टीकाही त्यांनी केली .

Tags: