Vijayapura

गेल्या 40 वर्षात असे पापी सरकार पाहिले नाही : रमेश जिगजीनगी यांनी काँग्रेसवर टीका

Share

गेल्या 40 वर्षांत असे पापी सरकार राज्यात कधीच पाहिले नाही. अशी टीका विजयपूर लोकसभा मतदारसंघातील एनडीएचे उमेदवार रमेश जिगजीनगी यांनी काँग्रेसवर केली . विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील कन्नूर गावात आयोजित कार्यकर्त्यांच्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

आजवर पाहिलेला महान नेता नरेंद्र मोदी आपल्या नातेवाईकांना सरकारच्या जवळ न आणता देशासाठी रात्रंदिवस झटत आहेत. आपल्या आईचे निधन झाले तेव्हाही कमी वेळ देऊन कर्तव्यात परतून ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी सांगितले.

७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत न चुकता मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपचे जिल्हाध्यक्ष आर.एस.पाटील कुचबाळ , अरुण शहापुर, अप्पू पट्टणशेट्टी, प्रकाश अक्कलकोट, संजीव ऐहोळे, एरण्णा रावरूर, मुलुनगौडा पाटील, चिदानंद चलवादी , सिद्धनगौडा पाटील, एस.ए. पाटील, शंकर गौडा पाटील, भीमू साहुकार बिरादार, महेंद्रसिंग पाटील, सिद्दू दस्तरेड्डी, स्वप्ना कनमुचनाळ यांच्यासह कार्यकर्ते नेते होते.

Tags: