अनैतिक संबंधामुळे एका जोडप्याचा खून झाल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील मरदगी तांडाजवळ घडली.
कल्लाप्पा कुंबार (३५) आणि पार्वती तलवार (३८) यांची हत्या करण्यात आली. ते निडगुंदी तालुक्यातील गणी गावचे रहिवासी होते. विवाहित पार्वती आणि कल्लाप्पा यांचे अनैतिक संबंध होते. पार्वती आणि कल्लाप्पा मरदगी तांडाजवळील शेतात एकत्र असताना त्यांची हत्या झाली. तसेच हत्येनंतर मारेकऱ्यांनी मृतदेहावर काटेरी झाडाच्या फांद्या टाकल्या .
पार्वतीच्या कुटुंबीयांनीच ही हत्या केल्याचा संशय आहे. सीपीआय शरण गौडा आणि पार्वती पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी निडगुंदी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. ही घटना निडगुंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे .


Recent Comments