Dharwad

मोदी, जोशींवर टीका केली नाही तर लाड मंत्रिपद गमावतील : प्रल्हाद जोशी

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर टीका केली नाही तर संतोष लाड यांचे मंत्रिपद जाण्याची भीती आहे, असे सांगत धारवाड लोकसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार प्रल्हाद जोशी यांनी कामगार मंत्री संतोष लाड यांच्यावर लाड यांच्याच कलघटगी मतदार संघात टोला लगावला.

प्रल्हाद जोशी यांनी गेल्या सोमवारी धारवाडच्या कलघटगी विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची बैठक घेतली, ज्यामध्ये मंत्री संतोष लाड यांच्या भाजपविरोधातील वक्तव्याचा मुद्दा मांडला आणि त्यांच्या वक्तव्याचा प्रतिवाद केला. मंत्री लाड यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री जोशी यांच्यावर सातत्याने टीका केली तरच त्यांचे मंत्रीपद टिकणार आहे. अलीकडेच मी एका फ्लाइटमध्ये संतोष लाड यांना भेटलो,

आणि मी त्यांना विचारले की, तुम्ही माझ्यावर टीका करता ते करताच पण मोदींवर सारखी टीका का करता?, तर त्यांनी स्वतः हिंदीत सांगितले की आमच्या हायकमांडचा आदेश आहे. मी तुमच्यावर टीका केली नाही तर माझी नोकरी जाईल, तेव्हापासून त्यांची टीका मनावर घेत नाही, तुम्हीही मनावर घेऊ नका, असे जोशी कार्यकर्त्यांना सांगत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Tags: