समाजात मराठ्यांना पद्धतशीरपणे मुस्लिम विरोधी म्हणून चित्रित केले जात आहे, असा आरोप जिल्हा पालकमंत्री संतोष लाड यांनी केला.
धारवाड शहरातील मराठा विद्या प्रसारक मंडळात संतोष लाड फौंडेशनतर्फे मराठा जागृती परिषद आणि यशवंतांचा सन्मान कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री संतोष लाड यांच्याहस्ते करण्यात आले.
त्यानंतर बोलतांना मंत्री संतोष लाड म्हणाले की, आई जिजामाता यांच्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज इतके मोठे झाले. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात आपण महिलांना विशेष सन्मान देतो, हे समाजातील सदस्यांनी लक्षात घ्यायला हवे, असे ते म्हणाले. समाजातील मुलांचे शिक्षण झाले पाहिजे. तसेच बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. समाज एकसंध असेल तरच विकास होऊ शकतो. याबाबत आपण सर्वांनी मिळून समाजाच्या विकासासाठी काम करावे लागेल, असे ते म्हणाले.


Recent Comments